Thursday, January 29, 2009

तुझा धर्म कंचा?

परदेशात राह्ताना आपण अल्पसंख्यांक असल्याचा कधी कधी अनुभ्व येतो. बहुतांशी अमेरिकन सहिष्णू आणि तुमच्या मताचा (राजकिय, धार्मिक) आदर करणारे असतात. ह्याविषयांवर वाद टाळणारे असतात. तुम्हाला तुमची ओळख जपू देतात.
.....अपवाद ईव्हानजेलीकल नामक मूलतत्त्ववादी...... ते तुम्हाला कुठेही पकडून येशूचे थोरवी सांगतील, व त्याला न स्विकाराल्यास तुम्ही नरकात जाल असे बिनादिक्कत सांगतील....

पण अापल्याकडे, भारतात लहान मुलांना धार्मिक नेणीव ( identity) ओळख केंव्हा होते? मी आठवून पाहिले तर मला माझ्या आईवडिलांनी "आपण हिंदू आहोत" असे कधीही सांगीतल्याचे आठवत नाही. उलटपक्षी मी सात वर्षांचा असताना बोलताना माझी एक काकू मला म्हणाली की आपण हिंदू आहोत. मला ती संकल्पना खुप परकी वाटली. हिंदि बोलणारे म्हणजे हिंदू असे मला वाटले. आपण तर मराठी बोलतो, मग ही आपण हिंदू आहोत असे का म्हणते आहे? मधुराचा अनुभवही असाच अाहे.

माझी हिंदू नेणीव ही खुप उशीरा म्हणजे मी १३/१४ वर्षांचा असताना, मुख्यत: वाचनातून झाली. मधुराची अजुनही होत अाहे.

पण अमेरिकेत पालक मुलांची धार्मिक नेणीव ( identity) निर्माण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करतात. संडे स्कुल, समर कॆम्प, मद्रासा अश्या उपक्रमातुन मुलांमधील धार्मिकता वाढीस लागते. त्यासंदर्भातील काही अनुभव......

तीन वर्षांपूर्वी शिकागो विमानतळावर विमानाची वाट पाहत होतो. रमजानचे दिवस होते. मी बेगल- कॊफी खात बसलो होतो. बाजूला बसलेला, भारतीय वाटणारा एक ८ ते १० वर्षांचा माझ्याकडे बराच वेळ निरखुन पाहत होता. काही वेळाने मनातील उत्सुकता न रोखता आल्यासारखा मला म्हणाला, " आर यू नॊट फ़ास्टींग? यु आर मुस्लीम राईट? "

मी थक्क झालो. काय बोलावे ते मला कळेना. एवढ्या लहान मुलाशी काय वाद घालणार? "मला भुक सहन होत नाहीये" असे काहीतरी म्हणालो अाणि त्याला टाळले.

दुसरा अनुभव मधुराचा अाहे. क्लिव्हलंडला असताना निधर्मी विचारांच्या ज्यू प्राध्यापकांकडे एका पार्टीला गेली होती. तिकडे बहुतांशी लोक ज्यू धर्मिय होती. मधुरा खुर्चीत बसुन जेवताना एक ८ वर्षांची मुलगी तिकडे अाली व म्हणाली, " अार यु ज्यू? " मधुरा गोंधळली, "नाही" असे म्हणाली.


धार्मिक नेणीव ( identity) तिव्र झाली की मग "आमच्यातील" व "त्यांच्यातील" ही जाणीव ही वाढू लागते.

मुलांमध्ये धार्मिकता असावी, पण धर्माभिमान नसावा. ह्याचा एक सुखद अनुभव नुकताच अाला. मागच्या अाठवड्यात दन्तवैद्याकडे गेलो होतो. डॉक्टरांनी बोलावण्याची वाट पाहत होतो. वेळ येईपर्यंत माझ्या अायफोनवर गाणी ऐकत बसलो. एक भारतीय दिसणारा ८- ९ वर्षांचा मुलगा माझ्या फोन कडे पाहत होता.
मला एकदम उसळुन म्हणाला, "तुला माहित अाहे का, ह्यावर तुला व्हिडीअो पण पाहता येतात?"

मी अाश्चर्याचा भाव अाणून म्हणालो, "नाही!"
मग त्याचा चेहरा खुलला. एखाद्या प्राध्यापकासारखा उभा राहून त्याने मला माझ्या अायफोनचे प्रात्यक्षीत दिले. त्याच्या वडिलांच्या फोनवर त्याने काय काय अप्लीकेशन टाकली अाहेत, अाणि कुठली अप्लीकेशन "कूल" अाहेत ह्याची जंत्री दिली.

"माझ्याकडे काही चित्रपट अाहेत, ते मी अायफोनवर पाहू शकतो का? "

"नक्कीच, पण त्यासाठी तुला लॅपटॉप अाणि एक वायर लागेल, अाहे का तुझ्याकडे अाहे ?" त्याने लगेच उत्तर दिले.

मी मनोमन म्हणालो, लेका तुझा अाणि माझा धर्म एकच!

Labels: , , ,

Monday, March 03, 2008

लासवेगासनगर


पूरा मम पत्नी उक्तवती, आवाम् लासवेगासनगरम् गच्छाम:। अहम् आमेति उक्तवान। किंचीत कालांतरे सा पुन: उक्तवती, "आर्यपुत्र, अहम् वेगासनगरम् गन्तुम् इच्छामि, त्वमपि इच्छसि वा? " आवाभ्याम् वेगासनगरम् गच्छन्ते, इति मया उक्तम्।


सा पॄच्छन् आसीत्, अहम् आम् इति उक्तन् आसीत् ।

गत मासे सा क्रोधेन उक्तवती, भवान यदि भोजनं इच्छसि, तर्हि वेगासनगरे निवासप्रबंध कुर्यात।



भुभुक्षीत: अहं द्युतस्थानस्य आरक्षण क्रीतवान। अत: गत सप्ताहान्ते आवाम वेगासनगरे आस्ताम।

Tuesday, October 23, 2007

डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........

अधीक फोटो साठी क्लिक करा. http://picasaweb.google.com/shanshali/CAFire


लहानपणी शाखेत एक खेळ खेळायचो डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........
सध्या अाख्खा दक्षीण कॅलीफोर्निया हा खेळ खेळत अाहे. अापल्या मोसमी वारयांप्रमाणे इकडे सांता अाना नावाचे विचित्र उष्ण वारे वाहतात. हे मुख्यत: जमिनीवरुन पॅसिफिक महासागराकडे जातात. ह्याच काळात हवेतील अार्द्रता खुप कमी असते. गेली बारा वर्षे इकडे दुष्काळ असल्याने झाडे-झुडपे वाळलेली अाहे.
माझे घर अाणि अॉफीस व्हायटिंग रॅंच नावाच्या राखीव वनक्षेत्राच्या जवळ अाहे. हे वन सांटियागो कान्यान नावाच्या वनाला जोडलेले अाहे. सांटियागो कान्यान हे सिल्वराडो कान्यान, रोझ कान्यान, लाईमस्टोन कान्यान अश्या वनांना जोडले गेलेले अाहे. हा सर्व डोंगराळ भाग अाहे. (मला इथे राहताना लोणावळे, मळवली अश्या मराठी गावांची अाठवण येते. )


शनिवारी रात्री इकडे सांता अानाचे उष्ण वारे वाहू लागले. पाहता पाहता वेग ताशी ६० ते ७० मैल गेला. निरनिराळ्या कारणांनी दक्षीण कॅलीफोर्नियात १५ ठिकाणी वणवे पेटले. ह्यातील काही अागी मानवनिर्मित किंवा मानवी चूकीने लागल्या. रवीवारी दुपारी सर्वत्र शेकोटी पेटवल्या सारखा वास पसरला. संध्याकाळी माझ्या गॅलरीतून समोरच्या डोंगरावर धूर दिसू लागला अाणि रात्र पडताच जाणवले की संपूर्ण डोंगर ज्वाळांनी वेढला गेला अाहे.

त्यानंतर चालू झाले एक अस्वस्थतेचे पर्व...... केंव्हाही घर सोडून जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली. अश्यावेळी काय काय सामान बरोबर घ्यायचे ह्याची यादी केली. पासपोर्ट अाणि इतर महत्त्वाची कागदपत्रे, संगणकाच्या हार्डड्राईव्ह, लॅपटॉप संगणक, पाण्याच्या बाटल्या, काही खाद्य पदार्थ, जुजबी कपडे अश्या गोष्टी बॅगेत भरुन ठेवल्या. ऐनवेळी कुठे जायचे हा प्रश्न होताच. बरयाच ठिकाणी अागी लागल्याने सुमारे ९ लाख लोक विस्थापीत झाले अाहेत. हॉटेलं भरुन गेली अाहेत. शेवटी एका मित्राकडे जायचे ठरले. अाणि अाम्ही अस्वस्थपणे दिवस उजाडण्याची वाट पाहू लागलो.

सोमवारी सकाळी सूर्य खुप उशीरा उगवला. सगळे अाकाश धूराने काळवंडले होते. गॅलरी, जीना, गाडी राख अाणि धुळ ह्यांच्या मिश्रणाने भरुन गेली होती. अाग मात्र अाता दिसत नव्हती, डोंगराच्या दुसरया बाजूला गेली होती. अॉफिसला गेलो, नेहमीपणे काम सुरू होते. दुपारनंतर मात्र गोंधळ सुरू झाला कारण अॉफिस पासून २ मैल अंतरावरील डोंगरावर अाग दिसू लागली. पण अजूनही अाम्हाला घरी जायला सांगीतले नव्हते. सोमवार संध्याकाळ पर्यन्त अॉफिससमोरचा डोंगर संपूर्ण पेटला. पण अाताशा अागीची दिशा बदलली होती. माझ्या घराकडे अाग यायाची शक्यता कमी झाली होती. अाम्ही शांतपणे झोपू शकलो.

अाज सकाळी अॉफिसजवळची अाग मंदावल्याचे जाणवत होते. "अाता झोका नाही " असे अामच्या सुरक्षा अाधिकारयाने जाहिर केले. अाणि त्यानंतर १५ मिनिटात अागीने अापला बेभरवसा दाखवला. वनाचा मोठ्ठा हिस्सा पेटला अाणि अाग समोरच्या रस्त्यापर्यन्त येऊन पोहोचली. अाम्हाला ताबडतोब अॉफीस सोडून जायला सांगीतले.
डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........ म्हणत घरी अालो. ही अाग फक्त ३० टक्के नियंत्रणात अाहे. केंव्हाही काहिही होऊ शकते. हवेतील उष्मा खुप वाढला अाहे. श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत अाहे. गाडीच्या काचेवर राख जमा झाली अाहे. घरात एसी लाउन बसावे लागत अाहे. अॉफीसचे काय होणार अाहे ते माहीत नाही.

अधीक फोटो साठी क्लिक करा. http://picasaweb.google.com/shanshali/CAFire

Labels:

Monday, October 01, 2007

एका हिरकणीचा दुर्दैवी अंत

http://www.cnn.com/2007/US/10/01/phoenix.airport.death/index.html

एका हिरकणीचा दुर्दैवी अंत
हिरकणी.............. रायगडावर राहणारी एक गवळीण. रोज पायथ्याच्या गावात दुध विकायला जाणारी सामान्या स्री. पण एके दिवशी तीने असामान्य
गोष्ट केली. दुध विकून परत येताना तीला उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले होते, तीने रखवालदाराला विनंती केली "मला अात जाऊ द्या, माझी पोरं ऊपाशी अाहेत, मला त्यांना खायला घालायला पाहिजे, मी पाया पडते, मला गडावर जाऊ दे" रखवालरदार म्हणाले, " महाराजांची सक्त ताकीद अाहे, दिवेलागणीनंतर कोणीही गडावर प्रवेश करू शकणार नाही, तुम्ही अात्ता अात जाऊ शकणार नाही"
हिरकणी रडू लागली, हातापाया पडू लागली पण रखवालरदारांना काहीही फरक पडला नाही. मुलांची काळजी तीला सतावत होती, घरात कोणी नाही, पोरे उपाशी असतील, अश्या विचारांनी अस्वस्थ झाली...........पण तीने हार मानली नाही. तीने गडाचा कडा चढायला सुरवात केली. अशक्यप्राय वाटणारा कडा तीने केवळ मुलांच्या मायेखातर चढला.

अाज फिनीक्स विमानतळावे अश्याच एका एका हिरकणीचा दुर्दैवी अंत झाला. पहा (http://www.cnn.com/2007/US/10/01/phoenix.airport.death/index.html)
कॅरोल गोटबॉम नावाची स्त्री, घरी जायचे विमान सुटले म्हणून विमान कंपनीच्या अाधिकारयांशी वाद घालू लागली. "मी एक त्रस्त अाई अाहे हो, मला लवकर घरी जाऊ द्या असे विनवता विनवता तिचा अावाज चढला" पोलीस अाले, तिला बेड्या घातल्या अाणि कोठडीत टाकले. तीचा टाहो थांबला नाही, कोठडीत टाकल्यानंतरही तिच्या बेड्या काढल्या नाहीत. काही तासांनंतर ती म्रुत अवस्थेत सापडली. प्राथमीक अंदाजानुसार बेड्यांमधून सुटला करून घेताना तिला फास लागला आाणि गेली. तपास चालू अाहे.

हिरकणी सुदैवी होती, त्यावेळी राज्यकर्ते साक्षात शिवाजी महाराज होते, त्यांनी तिचे कौतुक केले, खणा नारळाने अोटी भरली. रायगडावर एक बुरुज बांधला अाणि त्याचे नामकरण केले "हिरकणीचा बुरूज"

कॅरोलचा राज्यकर्ता म्हणजे जॉर्ज बुश....... अगदीच दुर्देवी निघाली कॅरोल !

Sunday, September 30, 2007

भारतीय शेती

शरद पवार यांचा आत्मघातकी सल्ला
सौजन्य- महाराष्ट्र टाईम्स [ Wednesday, September 19, 2007 05:40:25 am]


औद्योगिक शहरी समाजात चलनाचे, तंत्रज्ञानाचे प्रस्थ आणि अवडंबर माजविले जाते. ते जैविक, नैसगिर्क घडामोडी असलेल्या शेतीत आणले गेले. यामुळे शेतीची लय बिघडली. भारतीय ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूवीर् उपनिषदांत आणि इतर ग्रंथांत कृषीविषयी सत्ये सांगितली आहेत. पाराशर मुनी म्हणतात, जंतुनाम् जीवनम् कृषि:. इतर अनेक संस्कृती वेळोवेळी मिटल्या; परंतु भारतीय संस्कृतीचा प्रवाह अखंडित राहिला तो यामुळेच.

.....

कृषिमंत्री शरद पवार यांनी शेती सोडण्याचा सल्ला दिला आहे. शेती शेतकऱ्याला आणि देशाला तारू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे दिसते; परंतु जगातील सर्वात सुसंस्कृत, समृद्ध, शांततामय जीवन जगणारे स्वीडन, हॉलंड, डेन्मार्क इ. 'स्कँडिनेव्हिअन' देश मात्र शेतीप्रधान आहेत.

शेती हा या देशाचा कणा होता. हा कणा मोडण्याचे प्रयत्न ब्रिटिशांनी केले; परंतु जे त्यांना जमले नाही ते हरित क्रांतीने घडविले. हरित क्रांती शेतीप्रधान नव्हती, तर उद्योगप्रधान होती. नॉर्मन बोरलॉग यांच्या चारपट उत्पादन देणाऱ्या संकरित बियाण्यांनी हुरळलेल्यांनी दूरगामी, भीषण परिणामांचा विचार न करता 'हरित क्रांती' ही संकल्पना आणली. शेती ही सर्वस्वी निसर्गाच्या आविष्कारांच्या कार्यपद्धतीवर आणि नात्यावर आधारित आहे, या मूळ तथ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले. संकरित बियाण्यांबरोबरच पाण्याची गरज अनेक पटीने वाढली, कीटकनाशके, तणनाशकांचा मारा सुरू झाला. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव, जीवाणू, गांडुळे नष्ट झाली. पाणी वाहून नेणारी हवा खेळविणारी सच्छिदता गेली. जमीन मृत झाली, क्षारपड झाली. शेकडो जातीचे कोट्यवधी जीवाणू, गांडुळे हजारो संयुगे तयार करीत होती. त्यांचे पोषण वनस्पतीला मिळत होते. हवा आणि पाण्यातून विघटित होणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा मुळांना होत होता. हे थांबले. फलधारणेसाठी परागीभवन महत्त्वाचे आहे. नव्या कृत्रिमतेमुळे बहुतांश परागीभवनासाठी जबाबदार असलेले कीटक नष्ट झाले. धान्य, भाज्या, डाळी, फळे इ.नी आपला स्वाद, कस, गंध गमावले, नि:सत्व बनले. ही घोडचूक टाळता आली नसती काय?

अमेरिकेच्या शेती खात्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे बिटिश सरकारने 'जगातील अन्नाचे कोठार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाईल नदीच्या खोऱ्यात, तेथील जमिनींच्या प्रचंड उत्पादकतेच्या कारणांचा शोध घेतला. नोंदलेल्या निरीक्षणांप्रमाणे तेथील मातीत वर्षातील सहा महिन्यांच्या, गांडुळांच्या कार्यक्षम वाढीच्या काळात, प्रति एकरामागे १२० टन गांडुळखताची भर पडते. उत्पादकतेचे कारण मुख्यत्वे गांडुळांची कार्यपद्धती आहे. पुण्याजवळील पाडेगाव ऊस संशोधन केंदाने केलेल्या १९५७ ते ६० मधील तुलनात्मक अभ्यासात स्पष्ट झाले होते की, रासायनिक खतांपेक्षा गांडुळांचा वापर केलेल्या शेतीमधून ३० टक्के जास्त उत्पादन मिळते; परंतु हे शहाणपण गाडले गेले; कारण याच सुमारास रासायनिक खत कारखान्यांचा उदय होत होता.

हरित क्रांतीनंतर उत्पादनखर्च वाढत राहिला. उत्पन्नाशी त्याचे प्रमाण अधिकाधिक व्यस्त होत गेले. परिसरातील जंगल तोडून विकणे भाग पडू लागले. पुढील काळात जैव-जनुक तंत्रज्ञानाने धुमाकूळ घातला. उद्योगसमूहांनी स्थापलेले ट्रस्ट, त्यांनीच निर्माण केलेल्या तथाकथित बिनसरकारी संस्था (एन. जी. ओ.), सरकारी बँका, शासनाची 'पशुपालन', 'महसूल' अशी खाती यांनी एकत्र येऊन कृत्रिम गर्भधारणेतून निमिर्लेल्या पशूंची, विशिष्ट वनस्पतींच्या लागवडीची सक्ती देशभरात केली. पशूंच्या मूळ जातींच्या सांडांमुळे शुद्धता गमावली जाईल, अशी कारणे देऊन स्थानिक बैलांच्या जातीचे खच्चीकरण करण्याच्या मोहिमा राबविण्यात आल्या. 'मॉनसेटो'सारख्या कंपन्यांनी फलन नहोणारी महागडी बियाणी शेतकऱ्यांच्या माथी मारली.

१९९०पासून अमेरिका आणि तिची सूत्रे हलविणाऱ्या आथिर्क सोतांकरवी जागतिकीकरण आणि उदारीकरणाची एक प्रकारची सक्ती जगभर सुरू झाली. देशातील धोरणे शेतकरी, गरिबांच्या विरोधात गेली. शेतकऱ्यांना सबसिडी देऊ नये, असा मतलबी प्रचार होऊ लागला. अमेरिकेचे उदाहरण देऊन हे राबविण्यात येत असताना, अमेरिकेत मात्र वेगवेगळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना किमान ५० टक्के ते कमाल १०० टक्के सबसिडी देण्यात येते, हे लपविण्यात आले. बँकांनी काढता पाय घेतल्याने शेतकरी पुन्हा एकदा सावकारांच्या पाशात अडकला. प्रचंड कजेर् काढलेल्या शेतकऱ्यांनी पीक घेणे सुरू करताच दलालांनी भाव पाडले. कजेर् फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती गमावली.

धान्य पिकविणारी विशिष्ट 'पॉकेट्स' देशात तयार केली गेली. 'भुकेसाठी अधिक अन्न' या उद्दिष्टाऐवजी 'बाजारपेठेसाठी अधिक धान्य' हे ध्येय बनले. गोदामे धान्याने भरली; परंतु खरेदी करण्याची क्षमता नसलेले गरीब भुकेने तडफडू लागले. बाजारपेठेची अर्थव्यवस्था यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाला बाजारात उभे करणे जरूरीचे होते. म्हणून शेतकऱ्यांची स्वयंपूर्णता मोडली गेली. उत्पादक आणि उपभोक्ता या दोन्ही भूमिकांची फारकत केली गेली. सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था मोडीत काढल्याने शेतकरी व गरीब अधिकच असहाय झाला.

सन १९७२च्या दुष्काळाने व्यथित झालेल्या विलासराव साळुंखे यांनी मर्म ओळखले. शेतीबाह्य रोजगाराची मलमपट्टी करणाऱ्या रोजगार हमी योजनेपेक्षा शेती फुलवून नंदनवन आणणाऱ्या पाण्याची हमी हवी. त्यांनी, एकरी पाणी न देता माणसी अर्धा एकरसाठी पाणी, अशी 'समन्यायी पाणी वाटपाची' कल्पना मांडली व स्वत: यशस्वीरीत्या राबवून दाखविली. पुरंदरसाख्या फक्त १५ इंच पाऊस पडणाऱ्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तालुक्यात नंदनवन फुलवले. तेथून प्रेरणा घेऊन शेतीला इतर पूरक कामांची जोड देऊन, साध्या दगडांच्या, लाकडांच्या बांधांनी पाणी अडवून अण्णा हजारेंनी ग्रामीण कायाकल्प घडविला. राजेंद सिंहांसारख्यांनी राजस्थानात 'अरवरी' नदीचे पुनरुज्जीवन केले. शहरांकडे होणारी स्थलांतरे या कामांनी रोखली, एवढेच नाही तर उलटी स्थलांतरे सुरू झाली. दुदैर्वाने 'सामाजिक काम करणाऱ्यांनी राजकारणात पडू नये', अशी चुकीची मानसिकता जनतेत रुजली असल्याने, या विधायक कार्याचे चळवळीत व पर्यायाने राजकीय प्रतिनिधित्वात, सत्तेत रूपांतर झाले नाही. तसे झाले तर हीच कामे 'धोरण' बनली असती.

शेतीसंबंधी संकल्पना, उदा. 'पाणलोट क्षेत्र विकास' राबवताना जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी इतर नैसगिर्क आविष्कार आणि माणूस यांचा एकत्रित विचार व्हायला पाहिजे; परंतु तसे न होता सर्व गोष्टी तंत्रज्ञानाच्या भोवती फिरत राहतात. विशेषज्ञ आणि अभियंते यांची तुकड्या-तुकड्यात मर्यादित विचार करण्याची सवय सम्यक आकलनाच्या आड येते. औद्योगिक शहरी समाजात चलनाचे, तंत्रज्ञानाचे प्रस्थ आणि अवडंबर माजविले जाते. ते जैविक, नैसगिर्क घडामोडी असलेल्या शेतीत आणले गेले. यामुळे शेतीची लय बिघडली. महात्मा गांधींचा आदर्श मानणाऱ्या मासानोबु फुकुओका या जपानच्या शेती खात्यातील कीटकनाशकतज्ज्ञाने असत्य जीवनाचा उबग येऊन नोकरी सोडली. निसर्गाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यात किमान हस्तक्षेप करणारी नैसगिर्क शेतीपद्धती त्यांनी विकसित केली. जपानमधील पिकांचे विक्रमी उत्पादन त्यांनी सातत्याने त्यांच्या हयातीत सुमारे सहा दशके घेतले. अमेरिकेतही त्यांचा मार्ग शेतकरी अनुसरत आहेत.

भारतीय ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूवीर् उपनिषदांत आणि इतर ग्रंथांत कृषीविषयी सत्ये सांगितली आहेत. पाराशर मुनी म्हणतात, ''जंतुनाम् जीवनम् कृषि:'' हेच कारण आहे की, इतर अनेक संस्कृती वेळोवेळी मिटल्या; परंतु भारतीय संस्कृतीचा प्रवाह अखंडित राहिला. आजऱ्याचे समपिर्त वृत्तीचे शेतकरी मोहन देशपांडे यांनी हा प्रवाह खळाळत राहावा यासाठी ऋषींच्या वचनांचा अभ्यास करून मृत जमिनीला पुनरुज्जीवित करण्याची सोपी पद्धती दीर्घ अभ्यास व प्रत्यक्ष शेतीतील प्रयोगांतून सिद्ध केली. या नैसगिर्क शेतीतून त्यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीवर आधुनिक रासायनिक शेतीपेक्षा जास्त कसदार उत्पादन घेत आहेत.

आज कार्बनी ऊर्जासोतांचा वापर, बांधकाम, नगदी पिके, प्रचंड वस्तुनिमिर्ती यामुळे जंगलाचा, परिसंस्थांचा प्रचंड नाश होत आहे. ग्लोबल वॉमिर्ंग, जैव विविधतेचा प्रत्यही होणारा नाश यामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. वातावरण बदलाचा अभ्यास करणारा सुमारे १५०० शास्त्रज्ञांचा समूह परोपरीने धोक्याचा इशारा देत आहे. अशा वेळी या विनाशाकडे होणारी वाटचाल थांबविण्याऐवजी ती गतिमान करणारे 'सेझ' आणि 'कॉपोर्रेट' शेतीसारखे विनाशकारी प्रकल्प हाती घेऊन शेती सोडण्याच्या सल्ले देणे हे आत्मघातकी आहे. भारतीय संस्कृतीचा प्रवाह खंडित करण्याचे, तो गाडण्याचे महापाप राजकारण्यांनी करू नये.

Friday, September 14, 2007

Article on India Agriculture

Tuesday, June 13, 2006

ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षणा पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांच्या 'कास्ट, कल्चर अँड सोशलिझम' या पुस्तकातील 'आय अॅम अ सोशलिस्ट' या लेखाचा हा स्वैर भावानुवाद डोळ्यांत अंजन घालणारा ठरावा. अनुवाद: प्रतिमा जोशी

भारतात आजवर पौरोहित्य करणाऱ्या वर्गात ज्ञानाचे केंदीकरण झाले तर या पृथ्वीतलावरील सत्ता आपल्या हातीच एकवटलेली राहील याची काळजी क्षत्रियांनी घेतली. मनुष्यजातीच्या प्रारंभीच्या काळात या दोन वर्णांची उपयुक्तता होती. पण पुढचा अनुभव असा की, आपण प्रजेच्या हिताचे विश्वस्त आहोत याचा पूर्ण विसर पडून सर्व साधने व सत्ताकेंदे आपल्या हाती असावीत व त्याची अधिकाधिक फळे आपल्यालाच मिळावीत, असाच प्रयत्न राजे लोकांनी केला. आपणाशिवाय अन्य सारे तुच्छ असून कोणत्याही प्रकारचा विरोध हे पापकृत्य असल्याचा दंडक त्यांनी घालून दिला. संरक्षणाऐवजी दमन, जतनाऐवजी शोषण अशी वैशिष्ट्ये मिरवणाऱ्या राजसत्ता एखाद्या संग्रहालयातील वस्तू बनून राहिल्या तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही.

सत्तेच्या या गुमीर्ला वाकविण्याची ताकद संपत्तीत असते. आथिर्क नाड्या हाती असलेल्या धनाढ्य वर्गापुढे राजाही नतमस्तक होतो तिथे इतरांचे काय? वैश्यांची ताकद नाण्यांच्या छनछनाटात असते. ज्ञानाचा मक्ता असलेला ब्राह्माण आणि शस्त्रबळावर राज्य करणारा क्षत्रिय हे आपल्याला शिरजोर होऊ नयेत, अशा विचाराच्या वैश्यांची संख्या कितीही असली तरी मेंदू मात्र एकच असतो. आपल्या संपत्तीच्या मार्गात राजसत्ता आडवी येऊ नये, यासाठी जातीचा बनिया फार जागरूक असतो. पण त्याच वेळी सत्ता राजाच्या हातून निघून शूदाहाती जावी, असे मात्र त्याला चुकूनही वाटत नसते.

आणि ब्राह्माणांचा प्रभाव, क्षत्रियांची ताकद आणि वैश्यांचे भाग्य ज्यांच्या श्ामामुळे एकवटून राहते ते कुठे आहेत? कोणत्याही काळात, कोणत्याही देशांत कणा बनून राहण्याचे कर्तव्य ज्यांच्या वाट्याला येते अशा शूदांचा इतिहास काय सांगतो? दहा माणसांमध्ये लाखोंची ताकद असणारी एकजूट त्यांच्यापासून अद्याप मैलोगणती दूर आहे. साहजिकच निसर्गाच्या नियमानुसार शूदांचे दमन होत राहते.

पण असाही काळ येईल, जेव्हा शूद त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी उठाव करतील. आज वैश्यांची आणि क्षत्रियांची वैशिष्ट्ये अंगी बाणवून ते जसा स्वत:चा उत्कर्ष करू मागताहेत तशा प्रकारे नव्हे, तर स्वत:ची जन्मजात वैशिष्ट्ये कायम बाळगून क्षत्रिय नि वैश्यांचा अर्क न बनता शूद म्हणूनच हा वर्ग सवोर्च्चता प्राप्त करेल. आज त्यांची अवस्था जनावरापेक्षाही दयनीय असली तरी शूद सामाजिक क्रांतीचे वाहक बनणार आहेत.

शूदांची लायकी त्यांच्या चांगल्या वा वाईट गुणांवर नाही तर जन्मावर आधारित आहे. भारतातील या जातिव्यवस्थेत शूद नेहमीच तळाशी गाडले गेले. सर्वप्रथम शूदांना संपत्तीचा अधिकार नाकारला गेला, मग ज्ञानार्जनाचा आणि विद्येचा अधिकार नाकारला गेला. एखाद्या शूदवणीर्याने अद्वितीय गुण प्रकट केलेच, तर त्याला एकट्यालाच आपल्या सीमित वर्तुळात खेचून सामावून घ्यायचे, त्याच्या माणसांपासून त्याला अलगद एकटे पाडायचे आणि आपला प्रभाव टिकून राहण्यासाठी त्याच्या गुणांचा वापर करून घ्यायचा, अशी खेळी खेळली गेली.

ज्यांचा जन्म कोणत्या वर्णात झाला याबद्दल शंका आहेत अशी वशिष्ठ, नारद, सत्यकाम जाबाल, व्यास, कृप, दोण, कर्ण आणि बाकी उदाहरणे पाहिली, तर त्यांच्या अफाट विद्वत्तेमुळे त्यांना ब्राह्माणांचा वा क्षत्रियांचा दर्जा दिला गेलेला दिसतो; पण त्यामुळे शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया, नोकर, मच्छिमार किंवा सारथ्यकाम करणाऱ्यांचा काहीही फायदा झालेला दिसत नाही. तर दुसरीकडे ब्राह्माण, क्षत्रिय नि वैश्यांमधील अध:पतीत व्यक्तींना शूदांमध्ये गणले गेलेले दिसते.

आधुनिक भारतात शूद कितीही धनिक अथवा विद्वान कुटुंबात जन्मला असला तरी त्याला आपला स्वत:चा समूह सोडण्याची अनुमती नाही. या जातिबद्ध समाजरचनेमुळे व्यक्ती कितीही शिकली आणि प्रगत झाली तरी ती विशिष्ट वर्तुळातच सीमित राहते. जातीपलीकडे जाऊन व्यक्तीचे मूल्य जोपर्यंत मोजले जाणार नाही, तोपर्यंत बदलाची ही प्रक्रिया चालू राहील. या प्रक्रियेत शेवटी श्ामिक शूदांची सत्ता प्रस्थापित होईल. आजपर्यंत पहिल्या तीन वर्णांनी सत्ता चाखली. आता पाळी शूदांची आहे. कोणीही हे थांबवू शकणार नाही. समाजवाद ही परिपूर्ण व्यवस्था आहे म्हणून मी समाजवादी नाही, तर भाकरीच न मिळण्यापेक्षा अधीर् भाकरीही बरी असे मला वाटते.

जर मजुरांनी काम करायचे थांबवले तर तुम्हाला मिळणारे अन्न आणि तुम्ही परिधान करत असलेली वस्त्रे यांचे उत्पादनच थांबेल... आणि तरीही स्वत:च्या संस्कृतीच्या बाता मारत या लोकांना 'खालच्या' वर्गातले म्हटले जाते! जगण्याच्या झगड्यात विद्या संपादन करून जागृत होण्याची संधीच त्यांना मिळालेली नाही. त्यांनी वर्षानुवषेर् यंत्रवत कामच केले आणि आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर विशिष्ट लोकांनी या कामाची फळे चाखली, पण आता काळ बदललाय. आपले न्याय्य हक्क या कष्टकरी वर्गाला समजले आहेत आणि ते मिळवण्याचा निर्धारही त्यांच्यापाशी आहे. आता कितीही प्रयत्न केले तरी उच्च जातीचे लोक 'खालच्या' जातीच्या लोकांचे दमन करू शकणार नाहीत. खरे तर या मागास राहिलेल्या लोकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यातच तथाकथित उच्चवणीर्यांचे हित आहे.

जेव्हा ही बहुसंख्या पूर्णपणे जागी होईल तेव्हा आपले कसे शोषण झाले आहे, ते त्यांना कळून चुकेल आणि त्यांच्या नुसत्या फुंकरीने 'उच्च' लोक फेकले जातील. समाजाची संस्कृती याच बहुसंख्येने घडवली आहे आणि उद्या हीच बहुसंख्या तिला खाली खेचू लागेल. रोमन साम्राज्याचा अंत कसा झाला होता ते आठवून पाहा! म्हणूनच मी सांगतो की, धुळीत पडलेल्या या वर्गाला ज्ञान आणि संस्कृतीत भागीदारी देऊन त्यांच्या उन्नतीच्या वाटा मोकळ्या करून द्या. उच्चवणीर्यांच्या या चांगल्या कृतीबाबत ते कृतज्ञच राहतील.

गावोगावच्या कष्टकरी बहुजन बांधवांना जागे करण्याचे कर्तव्य पार पाडायला हवे. हिंदू धर्म ही ब्राह्माणांची मक्तेदारी बनली आहे, त्यामुळे ते हे काम करतील ही आशा सोडून शहाण्या लोकांनी हे करायला हवे. या धर्मावर ब्राह्माणांइतकाच सर्वांचा अधिकार आहे, हे प्रस्थापित करायला हवे. जीवनातील गरजा आणि शेती, व्यापार यांच्याबद्दल या बहुजनांना ज्ञान द्या... जर हे आपण करू शकत नसू तर तुमचे शिक्षण व्यर्थ आहे आणि तुमचे वेद नि वेदान्तही फुकाचा आहे.

भूतकाळाचे गोडवे गाणाऱ्या उच्चवणीर्यांना मी सांगू इच्छितो... तुमच्यातल्या बहुतेकांना आपले आर्यत्व आणि आपल्या उच्चवर्णात झालेल्या जन्माचा गर्व आहे. भारतातल्या उच्चवणीर्यांनो, तुम्हाला काय वाटते की, तुम्ही जिवंत आहात? तुम्ही तर दहा हजार वर्षांची जिवंत थडगी आहात... तुमचे अस्तित्व आता विलीन होऊ द्यात... एक नवी भारतमाता उदयास येऊ देत... शेतकऱ्याच्या नांगरातून.. मच्छिमारांच्या झोपड्यांतून.. गटई कामगारांच्या हत्यारांतून.. सफाईकाम करणाऱ्यांच्या झाडूतून... किराणा दुकानातून... कारखान्यांतून... रानावनातून.. दऱ्याखोऱ्यांतून! तुमच्या भाकरीतली अधीर् त्यांना द्या, आणि पाहा, तोंडातून 'ब्र'ही न काढता मूठभर धान्यावर कष्टाचे डोंगर उपसणाऱ्या त्यांच्यातल्या प्रचंड ऊजेर्ला सामावून घेण्यास हे विश्वही अपुरे पडेल.